Thursday, August 30, 2007

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...!



म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....



मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...

आज इथे उद्या तिथे...कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन....................
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.

मन् आपलं वेडं असतं...!


गंध आवडला फुलाचा म्हणून... ...
फूल मागायचं नसतं.


गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग
जरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

मी तिच्यात नव्हतो...!



मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.

आठवण...!



हसता हसता डॊळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दॊनच जीव ... आणखी कुणी नसॆल
भिरभिरल्यागत होण्यासारखंल बिलकु काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारख वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचावासा वाटेल
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकु काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागॆल ही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डॊळे पुसत, पाणी प्यावे थॊडॆ
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडॆ
सांगुन ध्यावं काळजीसारखं बिलकु काही नाही

"कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

Monday, August 27, 2007

आई...





आई
आई...
आई साठी काय लिहु
आई साठी कसे लिहु
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तीमत्व मोठे
जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातील छ्त्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं तसं ठंडगार पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी............. !

Saturday, August 18, 2007

कदाचीत तु हो म्हणशील...?




तुला पहिल्यांदा पाहील्यापासुनच
अगदी पहिल्या दिवसापासुनच
मनात ठरवलं होतं की तुला विचारावं
कुणी सागांवं कदाचीत तु हो म्हणशील

पण दरवेळी बोलताना थांबांयचो
हिम्मतच नाही करु शकायचो
मन नेहमी म्हणायंचं की सांगुन टाक एकदाचं
कदाचीत ती हो म्हणेल
असे करत कित्येक दिवस गेले
दिवसामागुन महीनेही सरले
कारण खरंच काही उमगत नव्हतं
की तु हो म्हणशील की नाही
पण मी कधीच बोलु शकलो नाही
मनातलं ओठांवर आणू शकलो नाही
आजही अबोल असा याच आशेवर आहे
की कदाचीत तु हो म्हणशील...?

प्रेमात पडल की असच होणार....!


प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
डोळ्यात तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग;
तीच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
तीच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्रान्समोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सार राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन जाणार्,
तीचा साधा meesage सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक senti mesage पहिला तीलाच forward होणर,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

मी कुठे कविता करतो...!



मी कुठे कविता करतो
मी फक्त शब्दांशी खेळतो
भावनांना कुरवाळून मी
स्वप्न उधळतो
मी कुठे कविता करतो
वेदना शब्द बनून वाहतात
भळभळत्या त्या जख्मां पुन्हा
ताज्या बनू पाहतात
कविता आणि मी, छे छे
मी दु:खांचा लिलाव करतो
मग एखादा सुखी ग्राहक
माझ्याकडे अश्रूंचाही भाव करतो
खरं तर,
घेणया पेक्षा माझे
देण्याचे विचार शुद्ध आहेत
पण, मी काय करावं, जर
घेणारेच माझ्या विरुद्ध आहेत

Thursday, August 16, 2007

सागं आठवण आली की काय करायचे?


नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे?
मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोन समजावयाचे,?
सागं आठवण आली की काय करायचे,?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे,
नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे?
फोन मात्र मीच करायचं,
H…..R… U मत्र तू बोलायचे,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे?

Wednesday, August 15, 2007

मनातील शब्दांची फुलपाखरे




मनातील शब्दांची फुलपाखरे
मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली ...
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !

कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ...

मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !